अहेरी : विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेसाठी नेहमीच तत्पर असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुन्हा एकदा आपली माणुसकीची ओळख जपली आहे.
अरेवाडा येथील ग्रामपंचायत सदस्या नीलाबाई कुमरे यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन पावला.आधीच निराधार व विधवा असलेल्या नीलाबाईंच्या खांद्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घर चालवणेही कठीण झाले होते.ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली.कंकडालवारांनी तात्काळ पुढाकार घेत नीलाबाई यांना वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत केली.त्यांच्या या मदतीमुळे नीलाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले,पण ते होते आभारांचे व दिलास्याचे अश्रू.
अजय कंकडालवार हे निवडणुकीपुरते लोकांमध्ये वावरणारे नेते नसून,प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे जननेते म्हणून ओळखले जातात.ते तेरवी, वाढदिवस,लग्नकार्य,आजारपण, नैसर्गिक आपत्ती अशा प्रत्येक प्रसंगी परिवारातील सदस्यासारखे सहभागी होतात.या छोट्याशा पण मोलाच्या मदतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की,नेतेपद फक्त पदावरून नव्हे,तर कृतीतून सिद्ध होत असते.