अल्लापल्ली : आज शनिवारी रोजी वसीम अरविंद रॉय राहणार सुंदरनगर तहसील मुलचेरा काही कामानिमित्त अहेरी ला आले होते. काम आटोपून दुचाकी ने आपल्या स्वगावी सुंदरनगर जाण्यासाठी निघाले असताना आलापल्ली वरून दहा किलोमीटर अंतरावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले तीथल्या काही येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी एकाने स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशन चे पदाधिकारी यांनी रुग्णवाहिकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले.तिथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले