![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0028-scaled.jpg)
![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0026-scaled.jpg)
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha )
सिरोंचा : सीमेवरील सिरोंचा येथील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून 33 व्या दिवशीही साखळी उपोषण सुरू आहे. आम्ही जमीन दिलो तर जमिनीचे मोबदला कधी देणार, प्रकल्पाचे पाणी हैदराबाद पर्यंत तेलंगणा नेत आहे तर प्रकल्पाचा बाजूला असलेल्या सिरोंचा तालुक्यातील गावांना महाराष्ट्र सरकार का बरं पाणी उपलब्ध करू देवू शकत नाही, मेडिगड्डा करारानुसार २०% पाणी आपल्या हक्काचा आहे. झिंगानूर सारख्या अनेक गावांत सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, 128 हेक्टरचे भुसंपादन तीन वर्षापासून स्थगित आहे. त्याचाच मोबदला महाराष्ट्र सरकार मिळवून देण्यास एवढा कालावधी लावत आहे,तर 128 हेक्टर पेक्षा अधिकधम शेतजमीन ब्याकवाटर ने बुडत असल्याबाबत आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदविला आहे त्या शेतजमिनींचा भुसंपादन कधी होणार अशा विविध मागणी घेऊन शासनाचा लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे सिरोंच्या तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला राम रंगुवार, लक्ष्मण गणपुरपु, वेंकटेश तोकला, प्रभाकररेड्डी मुस्कुला यांचा समावेश असून रोज वेगवेगळे शेतकरी उपोषण करत आहेत