सिरोंचा : काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी दिल्ली वरून सिरोंचा आलेल्या मुख्य अभियंता श्री.मनोज कुमार Bpsp & west zone headcorter नवी दिल्ली यांना राष्ट्रीय महामार्ग 353C सिरोंचा ते आलापल्ली चे सिरोंचा शहरात रुंदीकरण करून सूर्यपल्ली ते नंदनवन या दरम्यान बायपास रोड बांधण्याची मागणी केली आहे.त्यांनी एक पत्र लिहून कार्यकारी अभियंत्यांना कळवले आहे की सध्या रस्त्याची रुंदी फक्त 7 मीटर आहे आणि त्यात डिवायडर देखील नाही नागरिकांना नुकसान न होता रस्त्याची रुंदी वाढवून 11 मीटर करावी यामुळे वाहतूक सुचारूपणे चालू शकेल आणि अपघातांची शक्यता कमी होईल.डिवायडर लावला जावा यामुळे रस्ता सुरक्षित होईल आणि वाहतूक व्यवस्थित राहील.सूर्यपल्ली ते नंदनवन या दरम्यान बायपास रोडचे बांधकाम केले जावे यामुळे जड वाहनांचा शहरात प्रवेश कमी होईल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की रस्त्याची खराब स्थिती आणि वाहतुकीच्या समस्येमुळे त्यांना खूप त्रास होतो.त्यांनी आशा व्यक्त केली आहे की प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल आणि लवकरच योग्य कारवाई करेल.
त्यावेळी जेष्ठ कांग्रेस नेते एम.ए.अली,शिवसेना उबाटा तालुका प्रमुख उज्वल तिवारी,ग्रामीणचे रघु जाडी,सत्यनारायण बुर्रावार,पत्रकार देवा येगानंदूला,सारय्या सोनारी आदी गावकरी उपस्थित होते.
Home सिरोंचा सिरोंचा काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांची राष्ट्रीय महामार्ग 353C सिरोंचा ते आलापल्ली...