![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0028-scaled.jpg)
![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0026-scaled.jpg)
अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील आज कापसाच्या शेतात काम करत असताना वाघाच्या हल्यात मृतक सुषमा देवदास मंडल यांची जागीच ठार झाले आहे.प्राप्त माहिती नुसार सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून.
मागील 30 ते 35 वर्षीपासून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येते स्थायी झाली आहे.त्यांच्या घरी एक किराणा दुकान असून चिंतलपेठ गावात त्यांची शेती पण आहे.सुषमा देवदास मंडल यांनी आज सकाळी शेतात कापूस वेचणी करतांना.अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केली वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार झाली.मंडल परिवारावार दुःखाचे डोंगर कोसळले आहे.ही माहिती स्थानिक आविसं – काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अजयभाऊंनी घटना स्थळी धाव घेतली.
घटनास्थळी असलेल्या नागरिक आणि त्यांचे नातेवाईकांनी 10 मिनिट समोर वनविभागचे कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येते पोस्ट मोडम साठी हलवण्यात आली म्हणून सांगितल्याने.माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तीतून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते जाऊन मंडल परिवाराचा नातेवाईकांना भेट घेतली. फ़ॉरेस्ट विभागाचे अधिकारी मा.उपवनक्षक साहेबांना ब्रह्मणद्वणी द्वारे नरभक्षक वाघाला त्वरित जरबंद करण्याची विनंती केली.
यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली मा.हनमंतूजी मडावी,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगर सेवक,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊसह आदी उपस्थित होते.