Home मुख्य बातम्या आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी करण्याकरिता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे...

आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी करण्याकरिता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे मागणी

58
0

अहेरी : आलापल्ली पासून १० की.मी.अंतरावर असलेल्या तलवाडा गावात आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी आलेली नाही व त्यामुळे संपर्क करण्याकरिता व इंटरनेट ची कामे करण्याकरिता अडचण होत आहे.त्यामुळे गावातील नागरीकांना तसेच कर्मचारी वृदांना मानसिक व शाररीक त्रास सहन करावा लागात आहे. बरेच दिवसांपासून टॉवर चे काम बहुतेक पूर्ण झालेले असून मशीन लावणे काम बाकी आहे.

त्यामुळे वैयक्ति पाठपुरावा करुन सदर अडचणीकडे लक्ष देवून आंतरजाल जुळणी व भ्रमणध्वनी जुळणी लवकरात लवकर सुरु करण्यात यावी.याकरिता गावकऱ्यांनी आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केले आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी,क्रिष्णा वेलादी,वासुदेव सिडाम,मासा वेलादी,टिंकु सल्लाम,विठठल वगाडे,मंगु पोदाडी,संतोष आत्राम,अशोक तेलामी,निजरना वेलादी,सुमन पोदाढी,दुर्गे,बिनता हलदर इ.शाळा व्यवस्थान समितीचे सदस्य व गावकरी तसेच परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here