मुलचेरा : तालुक्यातील शांतीनगर येते काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शांतीनगर येथील नागरिकांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुक बाबत तसेच गावातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना तसेच गावातील युवक,नागरिकांना सांगितले की’काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.शांतीनगरसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान काँग्रेसचेनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना केले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,श्रीकांत हलदर माजी उपसरपंच शांतिग्रम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,नरेश गर्गम,सचिन पांचार्यासह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.